तुझ्या माझ्या ओल्या आठवणी
मनाच्या तळाशी रुजल्या आहेत
कधी कधी आसवांवाटे बाहेर येतात
इतक्या त्या माझ्यात भिनल्या आहेत
मनाच्या तळाशी रुजल्या आहेत
कधी कधी आसवांवाटे बाहेर येतात
इतक्या त्या माझ्यात भिनल्या आहेत
जेव्हा मनाच्या आभाळात
आसवांचा मग पाऊस बरसतो
नयनांच्या पागोळ्यांत
मी अबोल राहिले तरी
हा ओलावाच बोलका होतो
दाटून आलेल्या वादळाचा
मग ढगही हलका होतो
--शुभा मोडक (०७-मार्च-१२)
No comments:
Post a Comment